शेगाव, 18 नोव्हेंबर : महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद उफाळला आहे. मनसेसह भाजपच्या अनेक नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला जात होता. दरम्यान आज शेगावमध्ये त्यांच्या जोडो भारत यात्रेचं शेवटचं भाषण होतं. यावेळी ते सावरकरांबद्दल काही बोलणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. दरम्यान यावेळी त्यांनी सावरकरांबद्दल काहीही बोलणं टाळलं आहे. त्यांनी आपल्या भाषणात सावरकरांचा उल्लेख केलेला नाही. मात्र यंदा त्यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.

काय म्हणाले राहुल गांधी?
शिवाजी महाराजांबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला रस्ता दाखवला. ते शिवाजी महाराज बनले यामागे त्यांच्या आई जिजामातांचा मोठा हात आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं. त्यामुळे आज आपण त्यांचीही आठवण काढणे आवश्यक आहे.
राहुल गांधी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे


