अमित शहा यांच्या घरणेशाहीच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचे सडेतोड उत्तर
वर्धा : अमित शहा हे आमच्या घरणेशाहीवर बोलतात, माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचे होते म्हणून आम्ही युती केली,अशी टीका ते करतात, पण अमित शहा यांनी समजून घ्यावे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला यांच्या आशीर्वादाची गरज नाही आहे. मुख्यमंत्री पद म्हणजे काही क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्षपद नाही, ते काही जनतेतून निवडूण येत नाही. म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.
या हिंगणघाट येथील टाका मैदानावर झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, आपचे खासदार संजय सिंह, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि भारत आघाडीचे स्थानिक नेते मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात आले होते, त्या दिवशी चैत्य एकादशी होती. त्यांनी एक अभंग म्हटला, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी… कुणी त्यांना लिहून दिला होता मला माहिती नाही. पण हा माझा विठ्ठल माझ्या समोर बसलेला आहे हे त्याचं रूप आहे, म्हणत उद्धव ठाकरे यांनी समोर बसलेल्या जनतेला विठ्ठल म्हणून संबोधले. मोदीजी यात जनतेत विठ्ठल आहे. याच रूप बघा ! हा आनंदात आहे की नाही ते बघा. याचं सुख पाहिले बघा तुमचं सुख नंतर बघा… आजवर तुमच्या सुखासाठी आम्ही झटलो. आणि पदरामध्ये धोंडे पडले. गद्दारांना 50 खोके मिळाले, मी गेलो असतो तर मला किती मिळाले असते. पण मला ते खोके नको आहे, मला हे समोर बसलेली जनता पाहिजे आहे, हे माझे वैभव आहे. मोदीजी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी यांच्यावर तुमचा जीएसटी नाही लागू होत.

आजपर्यत मोदींनी वातावरण खराब केले. मोदींनी संपूर्ण भारत देश आणि जगामध्ये हिंदुत्व बदनाम केले आहे. ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना तुरुंगात टाकता, सम्पूर्ण देशात जुलूमशाही चालली आहे. संविधान बदलायला निघाले आहे. मित्रपक्ष विजयी करायला आपण आज वर्ध्यात आलो आहे. मला असे वाटायचे देश मजबूत करायला पाहिजे असेल तर देशात एका पक्षाचे सरकार पाहिजे आहे, पण यापुढे देशात एकाच पक्षाचे सरकार येऊ देऊ नका. हे घरणेशाहिवर बोलत आहेत. मोदीजी घरणेशाहिवर कुणी बोलायचं ज्याचं घराण आहे त्यांनी तरी बोलायला पाहिजे. अमित शहा आमच्या घरणेशाहिवर बोलतात, माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचे होते म्हणून आम्ही युती केली, पण अमित शहा यांनी समजून घ्यावे, माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला यांच्या आशीर्वादाची गरज नाही आहे. पण मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्षपद नाही, ते काही जनतेतून निवडूण येत नाही. म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.
अमर काळे यांचे भाषण संपवून उद्धव ठाकरे यांना बोलायला लावले त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, अरे मला अभिमान वाटला, अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात, अरे असच तर मर्द पाहिजे न आपल्याला, मर्द पाहिजे की नुसता शेपट्या घालणारा पाहिजे,नांग्या टाकणारा नकोय, नांग्या ठेचणारा पाहिजे, आजपर्यत जे झालंय… असे म्हणत उद्धव ठाकरे यांना सर्वांनी बोलण्याचा केला आग्रह… माझ्यानंतर उमेदवार अमर काळे बोलतील आणि येथून कुणी हलणारा नाही असे घेतले बसलेल्या जनतेकडून वचन घेतले.
केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे, ही डिटेक्टरशिप आहे – शरद पवार
नरेंद्र मोदींवर टीका केल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे, ही डिटेक्टरशिप आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (सप) अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी हिंगणघाट येथील जाहीर सभेत केली.



